पुणे – धरणक्षेत्रामध्ये पावसाने थैमान घातल्यामुळे धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे शहरातील नदीकाठच्या अनेक भागात पाणी शिरले आहे. बाणेर येथील साईदत्त रेसिडन्सीमध्ये देखील पूराचे पाणी शिरल्याने अनेक नागरिक इमारतीत अडकले होते. ही बातमी प्रशासनाला कळताच त्याठिकाणी एनडीआरफ टीमला पाचारण करण्यात आले. त्यानंतर एनडीआरफच्या जवांनानी रेस्क्यू ऑपरेशन करत बोटीच्या सहाय्याने पाण्यातून बाहेर काढत सुखरूप सुटका केली.