नवी दिल्ली – भारतीय रेल्वेने प्रवाशांना आणखी आरामदायी प्रवास करता यावा यासाठी एक महत्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. आता लांब पल्ल्याच्या प्रत्येक गाडीतील सर्व डबे वातानुकुलीत (एसी) करण्यात येणार आहेत, अशी माहिती रेल्वेच्या आधिकाऱ्यांनी दिली आहे.
प्रवाशांना अत्यंत कमी दरात रेल्वेचा प्रवास करता यावा यासाठी तर गेल्या सहा महिन्यांपासून प्रयत्न सुरु आहेत. आता याबरोबरच गाडीतील सर्वांसाठीच एसी यंत्रणा निर्माण केली जाणार आहे. यापूर्वी केवळ टी-टीयर, थ्री-टीयर तसेच स्लिपिंग कोच या डब्यांनाच एसी सुविधा देण्यात येत होती. मात्र, आता नव्या योजनेनूसार जनरल डब्यांसह सर्वच गाडी एसी करण्यात येणार आहे.
या योजनेनुसार स्लीपर कोच तसेच विना आरक्षित श्रेणीच्या डब्ब्यांचेही एसी कोचमध्ये रुपांतर होणार आहे. रेल्वे कोचेस तयार करणाऱ्या कारखान्याला एक नमुना डबा तयार करण्याची सुचना करण्यात आली असून अशी एक संपूर्ण गाडी एसी करण्यात येणार आहे. त्याची चाचणी झाल्यावर अन्य गाड्यांबाबत निर्णय घेतला जाणार आहे. तसेच डब्यातील आसनसंख्येतही वाढ होणार आहे. थ्री-टीयर बोगीत आता 72 ऐवजी 83 आसने ठेवली जातील. जनरल डब्यातील आसनसंख्या 105 केली जाणार आहे.