पुणे – हवामान विभागाने राज्यासह पुण्यालगतच्या घाटामाथा परिसरात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यावर खबरदारीचा उपाय म्हणून पानशेत धरणातून रविवारी दुपारपासून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सध्या धरणातून खडकवासला धरणात 902 क्युसेकने विसर्ग सुरू आहे.
दरम्यान, या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात, सोमवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतली. पानशेत धरण सध्या 100 टक्के भरलेले असून वरसगाव धरणही 99 टक्के भरले आहे. तर खडकवासला धरणात 74 टक्के पाणीसाठा आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास पानशेत आणि वरसगावमधून विसर्ग केला जाईल. त्यामुळे खडकवासला धरणात कमी पाणी ठेवण्यात आले आहे.