परळी – भाजपच्या आघाडीच्या नेत्या आणि सध्या एकाला चलो अश्या स्थितीत असणाऱ्या पंकजा मुंडे यांनी चिक्की प्रकरणावर भाष्य केले आहे. एका आयोजित मुलाखतीत त्यांना चिक्की प्रकरणावर प्रश्न विचारण्यात आला, त्यावर त्यांनी आरोप करणाऱ्यांना चांगलेच सुनावले.
चिक्कीचा ब्रँड जर माझ्या नावाने वाढत असेल. ते खाऊन लोकांचं आयर्न वाढत असेल. मला हरकत नाही”, ‘चिक्की प्रकरणात कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचं त्यांनी सांगितलं.
न्यायालयाच्या आदेशाबाबत माध्यमांमध्ये चुकीची माहिती आल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. भाजपा शिवसेनेचे सरकार असताना चिक्की प्रकरण गाजले होते.
मात्र पंकजा मुंडे यांनी आपल्यावरील बिनबुडाचे असल्याचं वारंवार सांगितलं आहे. पुढेजाऊन त्या म्हणाल्या माझ्या मंत्रीपदाच्या काळात मी अनेक महत्वाचे निर्णय घेतले,
त्यामध्ये प्रामुख्याने निर्णयात पारदर्शकता आणि भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी मी पावलं उचलली.
शिक्षक भरती हा एकमेव विषय नाही. तुम्ही मला बघितलं की, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत अत्यंत सुंदर काम आहे, असे अनेक निर्णय मी घेतले आहेत.
मात्र आरोप करणाऱ्यांच्या डोक्यात असे विचार येऊ शकतात. त्यांना दोष देत नाही, कारण त्यांची पर्सनालिटीच तशी आहे. त्यांना कुठेही पैसा दिसतो. कुठेही माफिया दिसतो. कुठेही भ्रष्टाचार दिसतो, ते आरोप करणारच. मी माझं म्हणणं स्पष्टपणे मांडले.
चिक्की घोटाळा प्रकरण
पंकजा मुंडे मंत्री असताना महिला आणि बालकल्याण मंत्रालयाने एका दिवसात 24 आदेश काढले होते. चिक्की, चटई, डिश, पुस्तकं इत्यादी वस्तूंची 206 कोटींची खरेदी केली होती. यानंतर खरेदीत नियमभंग झाल्याचा आरोप करण्यात आला होता. 3 लाखांच्या वर ई टेंडर्स करण्याचा नियम आहे. यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती.