रावळपिंडी : पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात चौथ्या दिवशीही पावसाचा व्यत्यय आला. पावसामुळं मैदान ओलं असल्यान चौथ्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला.
त्यामुळे चौथ्या दिवशी शनिवारी एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही. त्यामुळे पंचानी चौथ्या दिवसाचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे हा सामना अनिर्णित राहणार हे निश्चित झालं आहे.
☔ Two rain disappointments ☔
The fourth day's play between Pakistan and Sri Lanka has been called off.
The third women's ODI between England and Pakistan has also been abandoned. pic.twitter.com/GZfyEcfXni
— ICC (@ICC) December 14, 2019
याआधी पावसामुळं तिस-या दिवशी केवळ ५.२ षटकांचाच खेळ झाला होता. चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेने ९१.५ षटकांत ६ बाद २८२ धावा केल्या होत्या.