नगर – देशभरात मंगळवारी ( १५ ऑगस्ट) स्वातंत्र्य दिवस मोठ्या जल्लोषात साजरा करत असताना अशातच पाकिस्तान जिंदाबाद, तसेच अन्य काही अक्षेपार्ह घोषणा देण्यात आल्या आहे. अशा एकून सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
अहमदनगरच्या भुईकोट किल्ला येथे पाच मुलांकडून आक्षेपार्ह घोषणाबाजी करण्यात आली आहे. लष्करी जवानांकडून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात याबाबात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पाच मुलांच्या टोळयाने ना रहे तकदीर अल्लाहू अकबर, भारत तेरे तुकडे तुकडे होंगे, इन्शा अल्लाह असे नारे दिले आहे.
यानंतर या पाचही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यातील दोन मुलांना भिंगार कॅम्प पोलिसांकडून अटक करण्यात आली असून तिघांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे.