नवी दिल्ली – असदुद्दीन ओवैसी यांचा एमआएम पक्ष आणि भाजप यांच्यात आतून हात मिळवणी असल्याच्या आरोपाचा कॉंग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी पुनरूच्चार केला आहे.
त्यांनी म्हटले आहे की त्यांनी युपी मध्येही भाजपबरोबरची मॅच फिक्स केली असून या मॅच फिक्सींगमुळे ओवैसी आणि भाजपची हातमिळवणी स्पष्ट झाली आहे असे त्यांनी म्हटले आहे.
मुस्लिम मतांची विभागणी करून विरोधकांना मिळणारी मते काटणे एवढ्या एकाच उद्देशाने भाजपकडून एमआयएम पक्षाचा उपयोग करून घेतला जात आहे असेही त्यांनी म्हटले आहे. भाजपला अपेक्षित ठिकाणीच ते आपल्या पक्षाचा उमेदवार देतात असा दावा करताना त्यांनी म्हटले की ते त्यांच्या तेलंगणा राज्यातील सर्व जागा का लढवत नाहीत याचाही खुलासा केला पाहिजे.