मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खोट्या बातम्या देणाऱ्या पत्रकाराविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. राज्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांची मुलगी स्पेनवरून आल्यानंतर तिला कोरोनाची लागण झाली अशी खोटी बातमी पत्रकारांनी दिल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
मात्र, कोणत्या चॅनेलच्या पत्रकारांविरुद्ध कारवाई करणार हे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले नाही. त्यांनी ट्विटमध्ये लिहले आहे कि, कोरोना कोरोनाबाधितांची नावे उघड केल्याप्रकरणी हि कारवाई होणार आहे. कोरोनाबाधितांची नावे उघड करणे हि अतिशय गंभीर बाब असल्याचे ते म्हणाले. खोट्या बातम्या देऊन समाजात भीती निर्माण करणे चुकीचे असून अशा फेक बातम्या देणाऱ्या, निवेदक आणि पत्रकारांवर कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान गृहमंत्री देशमुख यांनी जितेंद्र आव्हाड यांना बातमी देणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचं सांगितले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी खोट्या बातमीची दखल घेतल्याबद्दल गृहमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
अहमदनगरमध्ये पत्रकाराला मारहाण –
घरात क्वारंटाईन करण्यात आलेल्या परिवाराने वृत्तपत्रात बातमी छापल्या प्रकरणी एका पत्रकाराला मारहाण केली आहे. सोनाई पोलिसातील एका अधिकाऱ्याने याची माहिती दिली.
पनेगाव मधील पत्रकार बाळासाहेब नवगिरे (३५) यांच्यावर बुधवारी १२ जणांनी हल्ला केला. नवगिरे यांनी होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या १७ परिवाराबद्दल स्थानिक वृत्तपत्रात बातमी दिली होती.
त्यामुळे नागरिकांनी त्यांच्या घरी जाऊन नवगिरे यांना मारहाण केली. पोलिसांनी सांगितले कि, सर्व आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणी आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नाही.