मुंबई : मुंबईतील मध जेट्टीजवळ बुडालेल्या तीन जणांपैकी दोघांचे मृतदेह सापडले आहेत, तर एका जणांचा मृतदेह अद्यापही बेपत्ता आहे, अशी माहिती गुरुवारी पोलिसांनी दिली. मधच्या धोंडीपारा जेट्टी ते वर्सोवा जेट्टीकडे जाणारी बोट बुधवारी सकाळी उलटली होती. या प्रवाशी बोटीतून सात जण प्रवास करीत होते. त्यावेळी ४ जणांना वाचवण्यात आले होते, तर तीन जण बेपत्ता होते.
पोलिसांनी सांगितले कि, बेपत्ता तीन जणांचे मृतदेह वर्सोवा जेट्टीजवळ देवाची वाडी जवळ सापडले आहेत. मृतदेहांना पोस्टमार्टमसाठी कूपर रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली,मृतांची ओळख अद्यापही पटू शकली नाही. लॉकडाउन नियमांचे उल्लंघन करून, कोणतीही दक्षता न घेतल्यामुळे आणि बोटीवरील प्रवाशांना लाइफबोट न दिल्याबद्दल पोलिसांनी बोट चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.