नवी दिल्ली : जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये लग्नाबाबत वेगवेगळ्या परंपरा पाळल्या जातात. हिंदू धर्मात लग्नाला सात जन्मांचे बंधन म्हटले आहे. लग्नाबाबत जगात अनेक विचित्र परंपरा पाळल्या जातात. लोक त्याच्याबद्दल जाणून आश्चर्यचकित होतात. भारतातील काही भागात विचित्र विवाह विधी पाळले जातात. इथे लग्नाबाबत पूर्णपणे वेगळी परंपरा आहे.
हे जाणून घेतल्यावर तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे पूर्णपणे सत्य आहे. वास्तविक, भारतात एका ठिकाणी दोन मुलेच एकमेकांशी लग्न करतात. ही परंपरा होळीच्या आधी पाळली जाते. यामागचे कारण खूप रंजक आहे. भारतातील राजस्थान राज्यातील एका गावात ही विचित्र परंपरा पाळली जाते. चला जाणून घेऊया या अनोख्या परंपरेमागील कारण काय?
* परंपरा थाटामाटात साजरी केली जाते
ही अनोखी परंपरा भारतातील राजस्थानमधील एका गावाशी जोडलेली आहे. राजस्थानच्या बडोदिया गावात दोन मुलांनी एकमेकांशी लग्न केले आहे. ही परंपरा होळीच्या आधी पाळली जाते. ही परंपरा दरवर्षी पाळली जाते. गावातील जास्तीत जास्त लोक यात सहभागी होतात. होळीच्या आदल्या रात्री ही परंपरा पाळली जाते, असे गावातील ज्येष्ठ सांगतात. परंपरेनुसार, दोन लहान मुले वधू आणि वर बनतात. संपूर्ण गावातील लोक या लग्नात सहभागी होऊन आनंद साजरा करतात.
* अशा प्रकारे वधू-वरांची निवड होते
लग्नासाठी अतिशय खास पद्धतीने वधू-वर म्हणून मुलांची निवड केली जाते. जी मुलं जान्हवं घालत नाहीत, म्हणजे ज्यांची मुंज झालेली नसेल, अशीच अल्पवयीन मुले वधू-वर होऊ शकतात. गोरिया समाजातील लोक वधू-वरांसाठी मुलांची निवड करतात. या प्रक्रियेला ‘गेरिया’ असेही म्हणतात.
दोन्ही मुलांचे विधीपूर्वक लग्न लावून अग्नीच्या चार फेऱ्या केल्या जातात. यासोबतच सात वचन देण्यात येतात. लग्नानंतर दुसऱ्या दिवशी वधू-वर झालेल्या मुलांना बैलगाडीत बसवून संपूर्ण गावात फिरवले जाते. यानंतर गावातील लोक एकमेकांना रंग लावून होळीचा सण साजरा करतात.
* विचित्र परंपरेमागील कारण काय ?
बडोदिया गावात लग्नाबाबत अनोखी परंपरा असण्यामागे एक खास कारण आहे. अनेक वर्षे हे गाव दोन भागात विभागले गेले. दोन्ही गावातील लोकांमध्ये प्रेम वाढवण्याचा अनोखा मार्ग लोकांनी शोधला. दोन्ही गावातून प्रत्येकी एक मुलगा निवडून त्यांचे लग्न लावून दिले जात असे. तेव्हापासून ही परंपरा सुरू आहे.