मुंबई : देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी दि.30 जानेवारी रोजी दरवर्षी संपूर्ण देशभर दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून त्यांना आदरांजली वाहण्यात येते. त्यानुसार यावर्षीही रविवार दिनांक 30 जानेवारी, 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात यावा, असे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने जारी केले आहे.
रविवारी (दि. 30 जानेवारी, 2022 रोजी) सकाळी 11.00 वाजता पाळण्यात यावयाच्या मौन (स्तब्धता) ची सुरुवात होण्यापूर्वी सकाळी 10.59 पासून 11.00 वाजेपर्यन्त इशारा भोंगा वाजविण्यात येईल. हा इशारा भोंगा संपल्यानंतर सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये/आस्थापना/शैक्षणिक संस्था/ विद्यापीठे यामधील अधिकारी/कर्मचारी/शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी तसेच नागरिक आदी सर्वांनी दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळावे, सकाळी 11.02 मिनिटांनी मौन (स्तब्धता) संपल्यासंबंधीचा इशारा भोंगा सकाळी 11.03 मिनिटांपर्यंत वाजविण्यात येईल.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी ३० जानेवारीला २ मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून आदरांजली वाहण्यात येते. त्यानुसार यावर्षीही स. ११ वाजता मौन पाळून हा दिवस #हुतात्मादिन म्हणून पाळण्यात यावा,असे सामान्य प्रशासन विभागाचे निर्देश आहेत. pic.twitter.com/U8HZGDeeu3
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 28, 2022
जेथे भोंग्याची व्यवस्था नसेल तेथे वरीलप्रमाणे सकाळी 11.00 वाजता मौन (स्तब्धता) पाळण्याबाबत योग्य ते निर्देश संबंधितांना देण्यात यावेत व हुतात्म्यांना आदरांजली गंभीरपणे व योग्य त्या आदराने मौन (स्तब्धता) पाळून देण्यात येईल याची दक्षता घेण्यात यावी.असे परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने जारी केले आहे.