बारामती (प्रतिनिधी) – महाराष्ट्राशेजारी मध्यप्रदेशमध्ये ओबीसी आरक्षणाचा विचार होतो. महाराष्ट्रात होत नाही. इतका विचार ओबीसी समाजाला येत नाही. हा समाज वेडा राहिला नाही. ओबीसी आरक्षणप्रश्नी दोन्ही सरकारचा वेळकाढूपणा आहे, अशी टीका राष्ट्रवादी युवकचे प्रदेश अध्यक्ष किशोर मासाळ यांनी केली.
मासाळ म्हणाले की, मंडल आयोगाला विरोध करणारे, इम्पॅरिकल डाटाला विरोध करणारे आणि डाटा जमा करायला वेळकाढूपणा करणारे हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ओबीसी समाजाच्या ताटात स्वातंत्र्यानंतर फक्त संघर्षच पडला आहे. लाखो ओबीसी प्रतिनिधींची हत्या करण्याचे षडयंत्र या देशातील राजकीय ताकद करीत आहेत. म्हणून हा डाव ओळखून महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी ओबीसी आरक्षणासाठी रस्त्यावर येणे गरजेचे आहे. ते पक्ष आपापल्या परीने आंदोलनाची नौटंकी करताना दिसत आहेत. ती नौटंकी थांबवून ओबीसीबाबत धोरणात्मक निर्णय होणे आवश्यक आहे.
मासाळ म्हणाले की, अखिल भारतीय ओबीसी सेवा संघाची बैठक पुणे येथे पार पडली. यावेळी राष्ट्रवादीने स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसींना 27 टक्के आरक्षणासहित जागा वाटप करण्याचा ठराव संमत करण्यात आला. बामसेफ व वामन मेश्राम यांनी ओबीसी समाजासाठी भारत बंदची हाक दिली. या दोन्ही संघटना व नेत्यांचे अभिनंदनपर ठराव पुण्यात ओबीसी सेवा संघाने घेतला. महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी अशा प्रकारचे ठराव करण्याची मागणी यावेळेस करण्यात आली. सवतीचे प्रेम दाखवणाऱ्या पक्षाला त्यांची जागा ओबीसी समाज दाखवणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
निव्वळ नौटंकी नको धोरणात्मक निर्णय हवा, यासाठी अखिल भारतीय ओबीसी सेवा संघ महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरून नौटंकी बाजांना जाब विचारणार असल्याचे यावेळी संघटनेने जाहीर केले.
यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. हनुमंतराव सुतार, प्रदेश अध्यक्ष तात्यासाहेब देडे, युवक प्रदेश अध्यक्ष किशोर मासाळ, कार्याध्यक्ष सचिन शाहीर, सचिव भारत भोंग, नानासाहेब टेंगले, अभिजीत काळे, संतोष राऊत, नवनाथ राणे, नूरजहॉ सय्यद,ज्योती कुटे, शुभांगी कादबाने, नंदिनी गायकवाड, प्रतिभा ढेंगळे, विकास साळुंके, उज्ज्वला खोमणे, सारिका आटोळे, महेश गायकवाड, नानासाहेब मदने, आकांक्षा कुंभार, दादासाहेब दांगडे, दादा टेंगले, सोनल नागरगोजे, मिननाथ भोकरे, नाना कुदळे, नीता फरांदे, आप्पा रेणके, भारत सद्गुरू, विनायक गवळी, संजय भंडलकर, प्राजक्ता रासकर, वैष्णवी गायकवाड, नितीन पिंपळशेंडे, सचिव संदीप आढाव, सूरज खोमणे, नितीन मासाळ, मोनाली महाजन, पदाधिकारी उपस्थित होते.