इंदोर – मध्यप्रदेश मधील महाविदयालयात आता रामायण, महाभारत, यांसारखे विषय आता पदवी अभ्यासक्रमाचा भाग असणार आहे. नवीन शिक्षण धोरण २०२० अंतर्गत मध्य प्रदेशमधील महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमामध्ये बदल करण्यात आला आहे. कला शाखेच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थांना महाभारत, रामचरितमानस, योग आणि ध्यान यासंदर्भात शिक्षण दिले जाणारं आहे.
नवीन अभ्यासक्रमानुसरा ‘श्री रामचरितमानस अप्लाइड फिलॉसफी’ हा पर्यायी विषय म्हणून ठेवण्यात आलाय. इंग्रजीच्या फाउंडेशन कोर्समध्ये पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना सी. राजगोपालचारी यांनी लिहिलेली महाभारताची प्रस्तावना शिकवली जाणार आहे. राज्याच्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी इंग्रजी आणि हिंदीबरोबरच योग आणि ध्यान या दोन विषयांना तिसऱ्या फाउंडेशन कोर्सच्या रुपामध्ये शिकवलं जाणार आहे.
यामध्ये ‘अमो ध्यान’ आणि मंत्रांसंदर्भातील अभ्यासाचा समावेश आहे. यासोबतच वेद, उपनिषदं आणि पुराणांचे चार युग’, ‘रामायण आणि श्री रामचरितमानसमधील फरक’ आणि ‘दिव्य अस्तित्वाचा अवतार’ हे विषयही शिकवले जाणार आहेत. याशिवाय श्री रामचरितमानसबरोबर २४ पर्यायी विषय देण्यात आले असून यामध्ये मध्य प्रदेशातील उर्दू गाणी आणि उर्दू भाषा यांचाही समावेश आहे.
मध्य प्रदेशचे उच्च शिक्षण मंत्री मोहन यादव यांनी या विषयांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आयुष्यातील मुल्यांबद्दल शिकवण देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. आपण रामचरितमानस आणि महाभारताकडून बरंच काही शिकलोय. त्यामुळे विद्यार्थ्यांना सन्मान देणं म्हणजे काय आणि इतर मुल्यांसोबरतच जीवनामध्ये पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल. आता आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवायचं नाहीय तर त्यांना महान व्यक्ती म्हणून विकसित करायचं आहे,” असेही ते म्हणाले.