लखनौ – केंद्र सरकार आणि उत्तरप्रदेश सरकारने आता देशातील सर्वच जातीधर्मांमधील गरीबांच्या स्थितीकडे लक्ष द्यावे अशी मागणी बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की देशाच्या बिघडलेल्या अर्थिक स्थितीमुळे गरीबांची स्थिती आणखीनच बिकट झाली आहे.
दारिद्रय निर्मुलनाच्या सरकारच्या सर्व प्रकारच्या योजनांमध्ये सरकारने पुरेशी गुंतवणुक करून या योजनांचा गरीबांना लाभ करून द्यायला हवा आहे.
केंद्र व राज्य सरकारांनी आपल्या सेवेतील सर्व रिक्त जागा भरण्याची विशेष मोहीम हाती घेऊन नोकऱ्यांची संधी सर्व वर्गांना उपलब्ध करून दिल्यास अनेक कुटुंबे सावरू शकतील असे त्यांनी म्हटले आहे. देश हितासाठी या उपाययोजनांना महत्व आहे असेही त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे.