पाटणा: बिहारी मजुरांना पररराज्यातून आपल्या राज्यात आणणाऱ्या 50 रेल्वे गाड्यातील प्रवाशांचा रेल्वे तिकिटांचा खर्च राष्ट्रीय जनता दल हा पक्ष करेल अशी घोषणा त्या पक्षाचे एक नेते तेजस्वी यादव यांनी केल्यानंतर मुख्यमंत्री नितीशकुमार यांनाही तडकाफडकी जाग आली असून त्यांनी आता बिहारच्या मजुरांचा रेल्वेखर्च राज्य सरकारकडून केला जाईल, अशी घोषणा केली आहे.
गावाकडे परतणाऱ्या स्थलांतरित मजुरांकडून रेल्वे जादा दराने भाडे वसूल करीत असल्याचे लक्षात आल्यामुळे अनेक मजुरांनी त्याचा निषेध नोंदवला होता. त्यावर कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आजच सकाळी या मजुरांच्या रेल्वे प्रवासाचे भाडे कॉंग्रेस पक्ष करील अशी घोषणा केली. त्या पाठोपाठ तेजस्वी यादव यांनीही आमच्या पक्षातर्फे 50 रेल्वे गाड्यांचा खर्च केला जाईल, अशी घोषणा केली. त्यामुळे शेवटी राज्य सरकारतर्फे हा खर्च केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केली.