कोझीकोडे – स्थलांतरित मजुरांनी गावाकडे परतण्यास अनुमती द्या या मागणीसाठी आज नंदीबाजार जवळ राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. हे सुमारे दोनशे मजूर कोझीकोडे-मंगलोर महामार्गावर ठाण मांडून बसले होत. शेवटी पोलिसांना बळाचा वापर करून त्यांना तेथून हलवावे लागले. या मजुरांना नेण्यासाठी सोमवारी एक विशेष रेल्वे गाडी सोडली जाणार होती; पण ती गाडीच रद्द झाल्याने हे मजूर हताश झाले होते.
रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की विशेष रेल्वे गाड्यांसाठी राज्य सरकारकडून तयारीच न दर्शवण्यात आल्याने त्यांना या विशेष रेल्वे गाड्या रद्द कराव्या लागल्या. येथून गेल्या दोन दिवसांत बिहार, झारखंड आणि ओडिशाच्या मुजरांना रेल्वे गाड्यांद्वारे त्यांच्या गावी नेऊन सोडण्यात आले. पण अजूनही तेथे अनेक मजुर अडकून पडलेले आहे. त्यांना नेणाऱ्या रेल्वे कधी सोडणार याची त्यांना कोणतीच कल्पना दिली गेली नाही त्यामुळे ते हताश झाले आहेत.