नवी दिल्ली : देशात कलम ३७० रद्द झाल्यानंतर आता सर्वत्र समान नागरी कायद्याची चर्चा आणि मागणी जोर धरू लागली आहे. याच विषयावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांनी महत्वपूर्ण विधान केले आहे. बिस्वा यांनी कोणत्याही मुस्लिम महिलेला तिच्या नवऱ्याने तीन विवाह करावेत असे कधीच वाटत नाही,असे म्हटले आहे.त्यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांनी देशात समान नागरी कायदा मुस्लीम महिलांच्या कल्याणासाठी आवश्यक असल्याचेही हिमंता बिस्वा यांनी म्हटले. तसेच कोणत्याही मुस्लीम महिलेला तिच्या नवऱ्याने तीन विवाह करावेत असं वाटत नाही, असे म्हटले. समान नागरी कायदा लागू झाला नाही, तर पुरुष अनेक लग्नं करत राहतील आणि त्यामुळे महिलांच्या मुलभूत हक्कांवर गदा येईल, असेही त्यांनी नमूद केले.
हिमंता बिस्वा म्हणाले, “औवेसी मुस्लीम नेते आहेत. मात्र, दुर्दैवाने मी त्यांना कायम मुस्लीम महिलांच्या विरोधात बोलताना पाहिलं आहे. देश स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत असताना मुस्लीम महिलांना सन्मानाचं आयुष्य देण्यासाठी समान नागरी कायदा लागू करणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे मुस्लीम महिलांच्या आयुष्यात चांगले बदल होतील. “दरम्यान, त्यांच्या या वक्तव्याने सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.