मुंबई – जयंत पाटील यांनी नुकतीच मुख्यमंत्री व्हायची इच्छा व्यक्त केली. पण राजकीय संख्याबळ लक्षात घेता ते सध्या शक्य नसल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यानंतर मविआ राष्ट्रवादी पक्ष आणि काँग्रेस पक्षातील नेत्यांकडून मुख्यमंत्रिपदासाठी इच्छा व्यक्त केली जात आहे. जयंत पाटील यांच्यानंतर आता काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी सुद्धा मुख्यमंत्रिपदाबद्दल वक्तव्य केले आहे.
माध्यमांशी बोलतांना अशोक चव्हाण म्हणाले,’मला कुठेही मुख्यमंत्री होण्याची घाई लागली नाही. उद्धव ठाकरे हे राज्याचे प्रमुख आहे. त्यांच्याबरोबर आम्ही मनापासून साथ देत आहे.’
ते पुढे म्हणाले, ‘अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्रिपदाबद्दल आपली इच्छाच बोलून दाखवली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आमचं उत्तम काम चालू असल्याचे सांगून आघाडीत मला बिघाडी करायची नाही., असंही चव्हाण यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या विधानामुळे सध्या संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधलं.