मुंबई : राज्यभरातील करोनाची दुसरी लाट ही आता ओसरताना दिसत आहे. मुंबईतही आता करोनाच्या रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असणाऱ्या लोकल ट्रेन संदर्भात आता चर्चा होताना दिसत आहे. मात्र मुंबई लोकल संदर्भात काही गोष्टी सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
2 दिवसात लोकल चालू ..
17 ऑगस्ट पासून शाळा चालू ..
मग 2 डोस घेतलेल्यांना .. मंदिर दर्शन का नाही ???
हे सरकार नाक दाबल्या शिवाय काहीच करत नाही का ??
हिंदूवर अन्याय करणे हा महाविकास आघाडीचा “किमान समान कार्यक्रम” झाला आहे !!!— nitesh rane (@NiteshNRane) August 7, 2021
याच मुद्यावरून सामाजिक आणि राजकीय वर्तुळात देखील मोठी चर्चा सुरू आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरून राज्य सरकारवर परखड टीका करणं सुरू केलं असताना सामान्य मुंबईकर देखील त्यासंदर्भात मागणी करताना दिसत आहेत. यातच आता या मुद्यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी महाविकासआघाडी सरकारला खोचक सवाल केला आहे.
काय म्हणाले आमदार नितेश राणे
2 दिवसात लोकल चालू .. 17 ऑगस्ट पासून शाळा चालू .. मग 2 डोस घेतलेल्यांना .. मंदिर दर्शन का नाही ??? हे सरकार नाक दाबल्या शिवाय काहीच करत नाही का ?? हिंदूवर अन्याय करणे हा महाविकास आघाडीचा “किमान समान कार्यक्रम” झाला आहे !!!