नवी दिल्ली : दिल्लीत सन 2012 साली झालेल्या निर्भया बलात्कार व हत्या प्रकरणातील चार आरोपींना फाशी देण्याची तयारी सुरू झाली असतानाच यातील एका आरोपीने आपल्यावरील शिक्षेचा फेरविचार केला जावा अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.
या प्रकरणातील अन्य तीन आरोपींनी या आधीच फेरविचार याचिका सादर केली होती पण त्या तिघांच्या याचिका कोर्टाने 9 जुलै 2018 रोजीच निकाली काढून त्या फेटाळल्या आहेत. यातील अक्षय नावाच्या 31 वर्षीय आरोपीने फेरविचार यचिका केली नव्हती. पण आता त्यानेहीं फाशी टाळण्यासाठी हा शेवटचा प्रयत्न सुरू केला आहे.
या प्रकरणातील पाचवा आरोपी रामसिंग याने या आधीच तिहार कारागृहात गळफास लाऊन आत्महत्या केली आहे. यातील अन्य एका अल्पवयीन आरोपीला तीन वर्ष सुधारगृहात ठेऊन नंतर त्याची सुटका करण्यात आली आहे.