मुंबई – मी मुख्यमंत्री असताना इंदू मिलवर भव्य स्मारक होण्याचा प्रश्न मार्गी लागला याचा मला आनंद आहे. पुढच्या महापरिनिर्वाण दिनाच्या आधी इंदू मिलमधील स्मारकाचे काम पूर्ण होण्याची मला अपेक्षा असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
आज भारत सर्वांत वेगाने विकास करत आहे. आपण लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहोत. मात्र, याचे श्रेय खऱ्या अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला जाते, असेही मत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी मंगळवार पासूनच मुंबईतील चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. या निमत्त राज्य सरकारच्या वतीने आयोजित अभिवादन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
BharatRatna Dr. Babasaheb Ambedkar’s global leadership is being accepted and adopted by countries all over the world!
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिक नेतृत्व जगभरातील देश स्वीकारत आणि अंगीकारत आहेत!
भारत रत्न डॉ. बाबासाहब अंबेडकर जी के वैश्विक नेतृत्व को दुनिया भर के… pic.twitter.com/R3vCLW2Q4w— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 6, 2023
लंडनमधील घराचाही उल्लेख –
लंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या घरात राहून अभ्यास केला, ते घर राज्य सरकारने विकत घेतले आहे. ते घर किंवा ती वास्तू पाहण्यासाठी जगभरातील लोक जात असतात, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. संविधानाच्या माध्यमातून आंबेडकर यांनी दाखवलेल्या महामार्गावर चालण्याच्या दृष्टीने आपण कार्य करु, अशी अपेक्षा त्यांनी या वेळी व्यक्त केली.