राजकोट – रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात सौराष्ट्र संघाने गुजरातवर 92 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. कर्णधार जयदेव उनाडकटने यंदाच्या मोसमात सर्वाधिक बळी घेत रणजी स्पर्धेत विक्रम साकार केला.
स्पर्धेच्या विजेतेपदासाठी आता सौराष्ट्रची बंगालशी लढत होणार आहे. शेल्डन जॅक्सनच्या दमदार शतकाच्या जोरावर सौराष्ट्रने पहिल्या डावात 304 धावा केल्या. गुजरातला 252 धावांवर रोखत सौराष्ट्रने धावांपर्यंत रोखले. उनाडकटने पहिल्या डावात 3 बळी घेतले.
दुसऱ्या डावात सौराष्ट्रचा निम्मा संघ केवळ 15 धावांतच तंबूत परतला होता. त्याचवेळी चेतन सकारियाने 45 तर, अर्पित वसवडाने शतकी खेळी केली. चिराग जानीनेही जबाबदारीने खेळ करत अर्धशतक फटकावले.
सौराष्ट्रने 274 धावा करताना गुजरातसमोर विजयासाठी 327 धावांचे आव्हान ठेवले. गुजरातच्या दुसऱ्या डावातही उनाडकटने भेदक गोलंदाजी करत 7 गडी बाद केले व संघाचा विजय साकार केला. उनाडकटने रणजी स्पर्धेच्या एकाच मोसमात सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम केला. या मोसमात त्याने 65 बळी घेतले. यापूर्वी 1998-99 च्या मोसमात कर्नाटकच्या दोड्डा गणेशने 62 बळी घेतले होते.