नवी दिल्ली : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) यंदाच्या मोसमात नव्या नियमानुसार अंतिम अकरा खेळाडूंमधील एखाद्या खेळाडूला दुखापतीमुळे उर्वरित सामन्यात खेळता आले नाही तर त्याच्या जागी बदली खेळाडूला संधी देण्यात येणार आहे.
या नव्या नियमाची माहिती मंगळवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जाहीर केली आहे. एका नव्या नियमाचा समावेश केला आहे.
या नव्या नियमाचा लाभ घेत असा बदली खेळाडू अव्वल कामगिरी करून सामन्याचा निकालदेखील बदलू शकतो.
दरम्यान, आयपीएलला येत्या २९ मार्च पासून सुरूवात होणार असून सलामीचा सामना मुंबई इंडियन्स विरूध्द चेन्नई सुपर यांच्यात होणार आहे.