मुंबई – राज्य सरकारचे नवीन महिला सक्षमीकरण धोरण लवकरच जाहीर केले जाईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी सांगितले. ते म्हणाले की महिलांच्या कल्याणासाठी ज्या ज्या उपाययोजना केल्या जात आहेत त्या प्रत्यक्ष गरजु महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकार कसोशिचे प्रयत्न करीत आहे.
येथे एका कार्यक्रमात महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शुभेच्छा देताना ठाकरे म्हणाले की, महिला केवळ स्वयंपाकघर आणि मुलांचे संगोपन एवढ्यापुरते मर्यादित राहिलेल्या नाहीत, तर या कर्तव्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी सर्व क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम केले आहे.राजकीय नेते म्हणून, आपण महिलांना कशी मदत करू शकतो हे पाहणे आपले कर्तव्य आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.
महिलांसाठी कायदे, सुविधा आणि आरोग्यविषयक पायाभूत सुविधा पुरेशा असण्याची गरज आहे आणि त्याबद्दल त्यांच्यातही जागरुकता निर्माण करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. महिलांमध्ये सर्व क्षमता आहेत, परंतु त्यांना फक्त संधींची गरज आहे.
महिला पोली कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर आणि परिचारिका यांनी कोविड महामारीच्या काळात विशेष परिश्रम घेऊनस आपले योगदान दिले आहे, याची जाणिव सर्वांना आहे असेही ते म्हणाले. राज्य सरकारने महिला पोलिस अधिकाऱ्यांचे कामाचे तास आठ तासांवर आणले आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.