नवी दिल्ली- रालोआ सरकारने दुसऱ्यावेळी मोठ्या मताधिक्याने कार्यभार स्वीकारला असतानाच सरकारसमोर आर्थिक आघाडीवर दोन मोठी आव्हाने उभी ठाकली आहेत. त्यामुळे नव्या सरकारला अतिशय कार्यक्षमतेने या संकटांचा सामना करावा लागणार आहे. केंद्रीय सांख्यकी विभागाने शुक्रवारी सायंकाळी जाहीर केलेल्या माहितीनुसार देशातील बेकारीचा दर 45 वर्षांच्या उच्चांकावर गेला आहे. तर दुसरीकडे औद्योगिक आणि कृषी उत्पादन ढासळल्यामुळे चौथ्या तिमाहीतील विकासदर 5 वर्षांच्या नीचांकावर गेला आहे. अश्यातच आता देशाच्या आर्थिक विकासात देखील घट झाली आहे.
दरम्यान, विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2018-19 च्या चौथ्या तिमाहीमध्ये देशाच्या आर्थिक विकास दरात घसरण झालीये. हा दर 6 टक्क्यांच्याही खाली घसरल्याचे दिसून आले आहे. ‘जीडीपी’चा दर घसरत असतानाच दुसऱ्या बाजूला देशातील बेरोजगारीचा दर 6.1 टक्क्यांवर पोहोचल्याचे दिसून आले आहे.
केंद्रिय सांख्यिकी आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार २०१८-१९ च्या चौथ्या तिमाहीमध्ये देशाच्या आर्थिक विकास दरात घसरण झालीये. हा दर ६ टक्क्यांच्याही खाली घसरल्याचे दिसून आले. 'जीडीपी'चा दर घसरत असतानाच दुसऱ्या बाजूला देशातील बेरोजगारीचा दर ६.१ टक्क्यांवर पोहोचल्याचे दिसून आलेय. pic.twitter.com/yb8r8FOhJc
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) June 1, 2019