सातारा – महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने दि. 4 आणि 5 नोव्हेंबर रोजी शिर्डी येथे राज्यातील प्रमुख कार्यकर्त्यांसाठी “राष्ट्रवादी मंथन : वेध भविष्याचा’ या दोन दिवशीय अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह दिग्गज यावेळी उपस्थित राहणार आहेत. सातारा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात पदाधिकारी, कार्यकर्ते या शिबिराला उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ. बाळासाहेब पाटील व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे वर्तमान स्थितीसंदर्भात आकलन वाढावे, भविष्यातील आव्हानांचा वेध घेण्यासाठी त्यांनी सज्ज व्हावे, राष्ट्र तसेच समाजाबद्दलची बांधिलकी भक्कम व्हावी या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून होणाऱ्या या शिबिरामध्ये शरद पवार, अजित पवार यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते, राज्याच्या विविध क्षेत्रातील विचारवंत, अभ्यासक मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी पक्षाच्यावतीने सभासद नोंदणी मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येणार आहे. ही मोहीम गतीमान करुन ग्रामीण तसेच शहरी भागात कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे निर्माण करण्यात येणार असल्याचे बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. या शिबिराला पक्षाचे जिल्ह्यातील खासदार, आमदार, जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, विधानसभेतील उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. यावेळी जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील उपस्थित होते.
पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे वर्तमान स्थितीसंदर्भात आकलन वाढावे, भविष्यातील आव्हानांचा वेध घेण्यासाठी त्यांनी सज्ज व्हावे, राष्ट्र तसेच समाजाबद्दलची बांधिलकी भक्कम व्हावी या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून होणाऱ्या या शिबिरामध्ये शरद पवार, अजित पवार यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते, राज्याच्या विविध क्षेत्रातील विचारवंत, अभ्यासक मार्गदर्शन करणार आहेत.
जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचाच झेंडा फडकेल
सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून कोणी कितीही गर्जना केल्या तरी सातारा जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची सत्ता येईल यात शंका नाही. जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस भक्कम असून नुकत्याच तालुकास्तरांवर झालेल्या मेळाव्यातून त्याची प्रचिती आली आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीचाच बोलबाला राहील, असे मत बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.
================