मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना मुंबई उच्च न्यायालयाने जुलै महिन्यात जामीन नाकारला होता. त्यानंतर मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागत जामिनासाठी अर्ज केला होता. आज नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर करत मोठा दिलासा दिला आहे.
नवाब मलिकांनी वैद्यकीय कारणास्तव जामीनासाठी अर्ज केला होता त्यानंतर प्रकृतीच्या कारणास्तव मलिक यांना दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर करण्यात आल्याचे समजते. जामिनानंतर नवाब मलिकांच्या कुटुंबाला अश्रू अनावर झाले आहेत.
मलिकांना जामीन मंजूर झाला असून दोन महिन्यांसाठी वैद्यकीय कारणास्तव ते तुरुंगाबाहेर असतील. सध्या त्यांच्या कुटुंबीयांमध्ये देखील आनंदाचे वातावरण असल्याचं दिसून येत आहे.
ईडीने केला आहे आरोप !
मुंबईच्या कुर्ला भागातील दाऊदच्या हस्तकांकडून मलिकांनी संपत्ती खरेदी केल्याचा आरोप ईडीने त्यांच्यावर ठेवला आहे. 20 वर्षांपूर्वी दाऊद इब्राहिमच्या हस्तक, त्याची बहिण हसीना पारकर, सलीम पटेल आणि सरदार खान यांनी मूळ मालकाला धमकावून त्या जमिनीचा व्यवहार केला होता, असेही ईडीकडून सांगण्यात आले आहे.