मुंबई – हनुमान चालिसा वादात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना सत्र न्यायालयाकडूनही दिलासा मिळालेला नाही. राणा दांपत्यांच्या जामीन अर्जावर आता 29 एप्रिल रोजी सुनावणी होणार असून तोपर्यंत दोघांचाही मुक्काम तुरुंगातच असणार आहे. अपक्ष खासदार नवनीत राणा, त्यांचे पती आणि आमदार रवी राणा यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. यानंतर त्यांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली होती मात्र येथेही त्यांची निराशाच झाली आहे.
मुंबईतील सत्र न्यायालयात राणा दांपत्यांकडून जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता आज यावर सुनावणी करण्यात आली राणा दांपत्यांचे वकील अॅड रिझवान मर्चंट यांनी जामीन देण्याची मागणी केली. तर विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी जामीनाला विरोध केला. आधी मॅजिस्ट्रेट कोर्टातून अर्ज मागे घ्यावा नंतर सुनावणी करावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली.
दरुम्यान, 29 एप्रिल रोजी राणा दांपत्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे या दोघांनाही 29 एप्रिलपर्यंत जेलमध्येच रहावे लागणार आहे हे आता निच्छीत झाले आहे. 29 एप्रिलच्या सुनावणी मध्ये कोर्ट यांना जामीन देणार की त्यांच्या जेलमधील मुक्काव वाढविणार यासाठी आता वाट बघावी लागणार आहे.