पुणे : येत्या 19 फेब्रुवारीपासून सर्व महाविद्यालयात राष्ट्रगीत सक्तीचे करण्यात आले आहे. राष्ट्रगीताने महाविवद्यालयाच्या कामकाजाची सुरवात व्हावी, असे निर्देश राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सर्व महाविद्यालयांना दिले आहेत.
19 फेब्रुवारीला शिवजयंतीचे औचित्य साधून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. महाविद्यालयातील कामकाजाची सुरवात राष्ट्रगीताने करावी, अशा निर्देशाचे पत्र सर्व महाविद्यालयांना दिल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यातील सर्व महाविद्यालयांनी या निर्णयाला चांगला प्रतिसाद दिल्याचे मंत्री म्हणाले.