जामखेड – मुंबईतील २६/११ च्या हल्ल्यात शहीद जवानांच्या स्मरणार्थ व हुतात्मा दिन स्मरणार्थ तरुणांमध्ये देश, समाज व राष्ट्राप्रती प्रेमाची अन् त्यागाची भावना जागृत राहण्यासाठी जामखेड पोलीस ठाण्यातर्फे सोमवारी (दि.४) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
विविध आजारांचे प्रादुर्भाव वाढले असून, रक्तदात्यांची संख्या त्या प्रमाणात कमी आहे. परिणामी नेहमीच रक्ताची कमतरता भासते. २६/११ च्या हल्ल्यातील शहीद जवानांच्या स्मरणार्थ व हुतात्मा दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवारी सकाळी १० ते पाच वाजेपर्यंत शिबीर आयोजित केले आहे. पोलिस निरीक्षक महेश पाटील म्हणाले,, कोणत्याही माणसाला रक्ताची उणीव भासू नये. यामुळे ‘मी रक्तदान करणार… तुम्हीही रक्तदान करा,’ असे आवाहन त्यांनी केले.