पिंपरी -दारू पिताना झालेल्या भांडणातून इंद्रायणी नदीच्या घाटाजवळ एकाचा गळा दाबून खून करण्यात आला. ही घटना सोमवारी (दि.9) सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे.
माधव अतरूषी साबळे (वय 30, मूळगाव, मु. पो. जांब अंध, ता. सेनगाव, जि. हिंगोली), सुधाकर ऊर्फ बंटी बबन वाघमारे (वय 30, मूळगाव हिंगलजवाडी, जि. उस्मानाबाद) आणि ज्ञानेश्वर पुंडलिक शिंदे (वय 56, मु. पो. हाडूलकी, ता. अहमदपूर, जि. लातूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस हवालदार गणेश दशरथ कळंके (वय 48) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सोमवारी सकाळी इंद्रायणी घाटाजवळ आळंदी येथे एक जण बेशुद्ध अवस्थेत मिळून आला.
शवविच्छेदन अहवालमध्ये त्याचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी चौकशी केली असता मयताचे नाव दिपक असल्याचे समजले. पोलिसांनी चौकशी केली असता दारू पिण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात तीन आरोपींनी मिळून गळा दावून खून केल्याचे कबूल केले.