पुणे : वडिलांकडे रागाने बघितल्याने दोघा सख्या भावांनी साथीदारांच्या मदतीने गॅरेजचालकाचा खुन केला. सायंकाळच्या वेळी भर रस्त्यात कोंढव्यात ही घटना घडल्याने भितीने वातावरण निर्माण झाले होते. जखमी तरुण गुडघ्यावर जखमी अवस्थेत बसून मदतीसाठी धावा करत होता. मात्र कोणीही पुढे न आल्याने त्याचा त्याच अवस्थेत मृत्यू झाला. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यावर त्याला ससून रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले. वडिलांकडे रागाने बघितल्याने दोघा सख्या भावांनी साथीदारांच्या मदतीने गॅरेजचालकाचा खुन केला.
बबलु इब्राहीम सय्यद(46, नवनीश पार्क, कोंढवा) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी लियाकत मिर(62, कुंभारवाडा, कसबा पेठ) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानूसार चार व्यक्तींविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी सईद फरिद सय्यद(24,रा.कसबा पेठ) आणी तौसिफ फरिद सय्यद(26) या दोघा भावांना अटक करण्यात आली आहे. तर त्यांचे दोन साथीदार फरार झाले आहेत.
यातील फिर्यादीचा पुतण्या बबलु याचे आरोपींबरोबर पाच वर्षापासून वाद आहेत. याचा राग मनात धरुण आरोपी कोंढवा येथे दाखल झाले होते. तेथे त्यांनी बबलुवर पाळत ठेवली होती. बबलु घराबाहेर पडल्यावर त्याला रस्त्यावर गाठण्यात आले. यानंतर पालघणसारख्या हत्याराने त्याच्यावर सपासप वार केले. भर रस्त्यात ही घटना घडली, बबलु रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यातच पडला होता. यामुळे नागरिकांची पळापळ झाली. माहिती मिळतात कोंढवा पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
…. अनेक वर्षाचा वाद ठरला खुनाचे कारण
बबलु याचे कसबा पेठेत गॅरेज आहे. तर फिर्यादी हा त्याचा चुलता असून त्याचे स्पेअर पार्टचे दुकान आहे. बबलु हा कसबा पेठेतून कोंढवा येथे रहायला आला होता. तर आरोपीही कसबा पेठेतून सहा सात वर्षापुर्वी कोंढव्यात रहायला आले होते. दरम्यान कसब्यात एकत्र रहात असताना त्यांच्यामध्ये वाद होते. या वादातून 2016,2017 आणी 2018 मध्ये त्यांनी एकमेकांविरुध्द विश्रामबाग आणी चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या होत्या.
सोमवारी दुपारी आरोपीचे वडिल गॅस सिलेंडर घेऊन जात असताना बबलु याने त्यांच्याकडे खुन्नसने बघितले होते. ही बाब त्यांनी घरी आल्यावर दोघांही मुलांना सांगितली. याचा राग मनात धरुन दोघाही भावानी दोन साथीदारांना घेऊन बबलूला गाठले. यानंतर त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले.