मुंबई – आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात सलग पाच सामने गमावल्यानंतर आता मुंबई इंडियन्सचे स्पर्धेतील आव्हानच संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झाला आहे. पाच सामने झाले असून, आता पुढील सर्व 9 सामने जिंकावे लागणार आहेत. त्यात केवळ सामने जिंकून काही होणार नसून नेट रनरेटही सरस ठेवावे लागणार आहे.
असे चित्र आहे
– मुंबईने 2015 साली फिनिक्स भरारी घेतली होती
– पहिल्या पाचपैकी चार सामने गमावले होते
– उर्वरित 8 पैकी 7 सामने जिंकले
– 2011 सालीदेखील 10 संघ होते
– प्रत्येक संघ 14 सामने खेळला
– किमान 16 गुण बनलेले संघ उपांत्य फेरीत पात्र ठरले
– याच निकषानुसार चार संघांना किमान 16 गुण गरजेचे
– उपांत्य फेरीसाठी किमान 8 सामन्यांत विजय आवश्यक
– मुंबईला 9 पैकी 8 विजय महत्त्वाचे
सलग पाच पराभवांमुळे मुंबईचा संघ गुणतालिकेत तळात आहे. इतकी सुमार कामगिरी यापूर्वी मुंबईकडून कधीही घडलेली नाही. त्यातच कर्णधार रोहित शर्माचा फॉर्म हादेखील चिंतेचा विषय बनला आहे. यंदाच्या स्पर्धेत मुंबई व चेन्नई याच संघांनी विजय मिळवला नव्हता. मात्र, चेन्नईने पहिला विजय मिळवला व हा दुष्काळ संपवला.
मुंबई अद्यापही विजयाच्या शोधात आहे. तसे पाहिले तर मुंबईने यापूर्वीदेखील असेच सलग सामने हरल्यावरही स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते, त्यामुळे हेच चित्र यंदाही होणार का, याची उत्कंठा चाहत्यांना लागली आहे.