मुंबई – पश्चिाम बंगाल आणि बांगलादेशातील मुलींना फूस लावून मुंबईत आणून त्यांना वेश्याव्यावसायात ढकलणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी दहिसर पूर्व येथील संजय गोविंद दास या दलालाला अटक केली असून पुढील तपास दहिसर पोलीस करत आहेत.
मगिरी निवास चाळ इथल्या ठाकूर कंपाउंड परिसरात काही हा उद्योग करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष 12 ला मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी याची खातरजमा करीत, दहिसरमधील गिरी निवास चाळीवर छापा टाकला. या छाप्यात तीन मुलींची सुटका करण्यात आली. तर संजय दास याला अटक करुन, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याचा अधिक तपास करायला सुरुवात केली आहे.