अॅड. भास्करराव आव्हाड यांना कायदेतज्ज्ञांची श्रद्धांजली
पुणे – अॅड. भास्करराव आव्हाड यांच्या निधनाने वकील वर्गातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. “चांगले वकील, न्यायाधीश घडवत अॅड. आव्हाड यांनी कायदा क्षेत्रात खूप मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या निधनाने कायदा क्षेत्राची कधीही भरून न येणारे हानी झाली आहे,’ अशी भावना कायदे तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
अॅड. भास्करराव आव्हाड हे अत्यंत हुशार होते. मोठ्या कष्टाने यशस्वी झाले होते. त्यांचे कायद्याचे ज्ञान तर सर्वश्रृत आहे. मात्र, ते कवी मनाचेही होते. आम्ही महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या समितीवर अनेक वर्षे एकत्रितपणे काम केले. त्यांनी हजारो विद्यार्थी घडविले, जे आज दिल्लीपासून सर्व प्रकारच्या न्यायालयात प्रॅक्टिस करत आहेत. त्यांच्या जाण्याने कायदा क्षेत्राची खूप मोठी हानी झाली आहे.
– अॅड. एस.के. जैन, ज्येष्ठ विधिज्ञ.
क्लासेसच्या माध्यमातून ऍड. भास्करराव आव्हाड संपूर्ण महाराष्ट्रातील वकिलांना परिचित होते. न्याय क्षेत्रात त्यांचे खूपच मोठे योगदान आहे. चांगले वकील, न्यायाधीश त्यांनी घडविले. त्यांच्या जाण्याने कायदा क्षेत्राचे निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. ते आपुलकीने वागत असत. एखाद्या मोठा खटल्यात यश मिळाल्यानंतर आवर्जून फोन करायचे.
– अॅड. हर्षद निंबाळकर, माजी अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा
आव्हाड सर यांचे कायदेविषयक ज्ञान प्रचंड होते. सगळे विषय एक वकील शिकवतो, हे पाहून मला कायम त्यांचे आश्चर्य वाटत. जनसंपर्क कसा असावा हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. राज्यभरातील वकिलांशी त्यांनी दांडगा संपर्क ठेवला होता. कधीही, कोणीही मदत मागितल्यास ते सदैव तत्परतेने मदत करत असत.
– अॅड. डॉ. सुरेशचंद्र भोसले, ज्येष्ठ विधिज्ञ.
आव्हाड सर यांचे कायदेविषयक ज्ञान प्रचंड होते. सगळे विषय एक वकील शिकवतो, हे पाहून मला कायम त्यांचे आश्चर्य वाटत. जनसंपर्क कसा असावा हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. राज्यभरातील वकिलांशी त्यांनी दांडगा संपर्क ठेवला होता. कधीही, कोणीही मदत मागितल्यास ते सदैव तत्परतेने मदत करत असत.
– अॅड. डॉ. सुरेशचंद्र भोसले, ज्येष्ठ विधिज्ञ.
अॅड. भास्करराव आव्हाड यांच्या कायदा क्षेत्रातील योगदानामुळे चांगले वकील, न्यायाधीश घडले. त्याबरोबरच त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे . एमआयटी संस्थेची स्थापन झाली, त्यावेळी ते संस्थेवर विश्वस्त होते. साहित्य क्षेत्रात मोठे योगदान आहे. अनेक पुस्तके, कविता लिहिल्या आहेत. ते प्रबोधन करायचे. त्यांच्या जाण्याने अनेकांचा मार्गदर्शक हरपला आहे.
– अॅड. सतीश मुळीक, अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन
अॅड. भास्करराव आव्हाड यांच्या कायदा क्षेत्रातील योगदानामुळे चांगले वकील, न्यायाधीश घडले. त्याबरोबरच त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे . एमआयटी संस्थेची स्थापन झाली, त्यावेळी ते संस्थेवर विश्वस्त होते. साहित्य क्षेत्रात मोठे योगदान आहे. अनेक पुस्तके, कविता लिहिल्या आहेत. ते प्रबोधन करायचे. त्यांच्या जाण्याने अनेकांचा मार्गदर्शक हरपला आहे.
– अॅड. सतीश मुळीक, अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन
मी नोकरी करून कायद्याचे शिक्षण घेत होतो. त्यावेळी थोरले बंधू अॅड. भरत शिंदे यांनी 1981मध्ये गुरूवर्य अॅड. भास्करराव आव्हाड यांच्याशी माझा परिचय करुन दिला. सरांच्या क्लासेसला मी सायंकाळी जायचो. संपूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थी सरांच्या क्लासेसला यायचे. सरांनी विद्यार्थ्यांना कधीही फीसाठी विचारणा केली नाही. 1984 ला वकील झाल्यापासून सरांना गुरू मानून वाटचाल केली. मी प्रसिद्ध करत असलेल्या “साहित्य लोभस’ दिवाळी अंकाचे गेली 27 वर्षे सर आधारस्तंभ होते. शुक्रवारी सकाळी सृष्टीचा भास्कर उगवला, पण माझ्या आयुष्यावर प्रभाव असणारा माझा तेजोनिधी भास्कर मावळला.
– अॅड. शिरीष शिंदे, ज्येष्ठ विधिज्ञ.
अॅड. आव्हाड सर एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते. उत्तम कायदे पंडित, आदर्श शिक्षक आणि महाराष्ट्रातील अनेक वकिलांचे ते मार्गदर्शक होते. त्यांनी उत्तम वकील आणि न्यायाधीश तर घडवलेच, पण त्याबरोबरच ग्रामीण भागातून पुण्यास विधी शिक्षणासाठी आलेल्या असंख्य विद्यार्थ्यांवर पुत्रवत प्रेम केले. गरीब ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन केले. वकिली व्यवसायातील मानबिंदू असणारे आव्हाड सर हे उत्तम कवी, साहित्यिक, संत साहित्याचे तसेच वैदिक न्यायतत्वशास्त्राचे गाढे अभ्यासक, उत्तम कीर्तनकार आणि प्रवचनकार होते.
– अॅड. श्रीकांत आगस्ते, माजी अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन