झारखंडमध्ये एकीकडे उष्णतेमुळे अवस्था बिकट आहे. त्याचबरोबर दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वीज संकटामुळे जनता हैराण झाली आहे. अशातच भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीची पत्नी साक्षी धोनीने वीज संकटावर प्रश्न उपस्थित केला आहे. 10 महिन्यांत पहिल्यांदाच साक्षीने ट्वीट करत सरकारला प्रश्न केला आहे. झारखंडमध्ये इतक्या वर्षांपासून वीज संकट का आहे ? असे ट्वीट साक्षीने केले आहे.
As a tax payer of Jharkhand just want to know why is there a power crisis in Jharkhand since so many years ? We are doing our part by consciously making sure we save energy !
— Sakshi Singh 🇮🇳❤️ (@SaakshiSRawat) April 25, 2022
झारखंडमध्ये वीज संकटामुळे लोक अस्वस्थ झाले आहेत. यावर आता साक्षी धोनीने प्रश्न उपस्थित केला आहे. तिने ट्विटमध्ये लिहिले की, झारखंडची एक करदाती म्हणून फक्त मला हे जाणून घ्यायचे आहे की येथे इतक्या वर्षापासून वीज संकट का आहे? आम्ही जाणीवपूर्वक खात्री करत आहोत की आम्ही उर्जेची बचत करत आहेत.
साक्षीने शेवटचे ट्विट वर्षभरापूर्वी केले होते. सततच्या लोडशेडिंगमुळे राज्यातील जनता हैराण झाली आहे. राज्यातील बहुतांश भागात तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे जात आहे. पश्चिम सिंगभूम, कोडरमा आणि गिरिडीह जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेने वेढले आहे. 28 एप्रिलपर्यंत रांची, बोकारो, पूर्व सिंगभूम, गढवा, पलामू आणि चतरा येथे उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
झारखंडमधील शहरांमध्ये सरासरी 5 तासांपेक्षा जास्त आणि ग्रामीण भागात 7 तासांपेक्षा जास्त लोडशेडिंग आहे. लोडशेडिंगमुळे नागरिकांचा नाहक त्रास वाढला आहे. लोकांना उन्हाळ्यात विजेविना जगावे लागत आहे.