चिंबळी – ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकावर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. तर ही पिके वाचवण्यासाठी शेतकरी औषध फवारणी करीत आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या या कष्टावर कुत्र्यांनी पाणी फेरले असून कांदा पिकाच्या शेतात धुमाकूळ घालून पिके नष्ट करीत असल्याने सध्या शेतकरी चौहुबाजुंनी संकटात सापडले आहेत. यंदा सुरुवातीला दमदार पावसामुळे खरीप हंगामातील पीक जोमदार आले होते. ते काढणीला येताच परतीच्या पवासाने धुमाकुळ घातला. त्यानंतर रब्बी हंगामाची पेरणी उशीरा झाली.
मात्र, थंडी नसल्याने पिकांची वाढ खुंटली असून ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने औषध फवारणीसाठी खर्च करावा लागत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यातच मोकाट कुत्र्यांनी मोर्चा कांदा पिकाकडे वळवल्याने शेतकरी पुरता हतबल झाला असून मोकाट कुत्र्यांना “आवारा’ अशी आर्त हाक देत आहे.