नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समान नागरी कायद्याचे समर्थन केले. त्यावरून विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली.
पंतप्रधान मोदी यांना कुठल्याही मुद्द्यावर बोलण्याची मुभा आहे. मात्र, बेरोजगारी, महागाई, मणिपूर हिंसाचार यांसारख्या खऱ्या मुद्द्यांपासून ते स्वत:ला दूर ठेऊ पाहतात.
त्यातूनच लक्ष विचलित करण्यासाठी ते समान नागरी कायद्यासारख्या मुद्द्यावर बोलत आहेत, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसने दिली. समान नागरी कायदा प्रथम हिंदू धर्मासाठी लागू करावा, अशी भूमिका द्रमुकने मांडली. समान नागरी कायद्याचा मुद्दा उपस्थित करण्यामागे ध्रुवीकरणाचे उद्दिष्ट असल्याचा आरोप जेडीयूने केला. खुद्द मोदींनी केलेले समर्थन आणि विरोधी पक्षांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहता समान नागरी कायद्यावरून राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.