मुंबई -महाराष्ट्र सरकारने आपल्यासह 16 बंडखोर आमदारांच्या घरांना दिलेले पोलीस संरक्षण काढून घेतले आहे, असा आरोप बंडखोर शिवसेना नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. राज्य सरकारने राजकीय सूड बुद्धीने ही कारवाई केल्याचे त्यांनी म्हटले आहे. शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना उद्देशून 16 आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र ट्विट केले आहे.
पत्रात आमदारांनी म्हटले आहे की, त्यांच्या कुटुंबीयांना काही इजा झाल्यास मुख्यमंत्री ठाकरे आणि सत्ताधारी महाविकास आघाडी (एमव्हीए) आघाडीचे नेते जबाबदार असतील. या आमदारांच्या घरांच्या व कुटुंबीयांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
या आमदारांच्या घरांना प्रोटोकॉल आधारे देण्यात आलेले संरक्षण काढून घेण्याची कृती बेकायदेशीर आहे असेही त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या दाव्याचा इन्कार केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, बंडखोर आमदारांच्या घराभोवतीचे संरक्षण काढून घेण्याचा कोणताही आदेश गृहमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेला नाही.
अशातच आमच्या कुटुंबीयांना सुरक्षा प्रदान करावी, अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्या गटानं केली. त्यासाठी त्यांनी काल केंद्रीय गृहमंत्रालय आणि राज्यपालांना पत्र लिहिलं होतं. या पत्राची दाखल घेत आता र आता बंडखोर आमदारांच्या घराला सुरक्षा देण्याचं काम मोदी सरकार करणार आहे.
मिळलेल्या माहितीनुसार केंद्रानं आमदारांच्या कुटुंबीयांना वाय प्लस श्रेणीमधील सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला. राज्यात काही ठिकाणी आमदारांच्या घरासमोर सीआरपीएफ (CRPF) जवान आज संध्याकाळी घराबाहेर तैनात केले जाणार आहेत.