इस्त्रोच्या वैज्ञानिकांना मोदींनी दिला धीर
बंगुलुरू: संपर्क तुटल्यामुळे चांद्रयान मोहीमेत तांत्रिक अडथळा आला असला तरी इस्त्रोच्या वैज्ञानिकांनी निराश होण्याची गरज नाही अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वैज्ञनिकांना धीर दिला आहे. संपर्क तुटल्यानंतर तुमच्या चेहरेऱ्यावरचे नैराश्य मला स्पष्ट जाणवले. पण निराश होण्याचे कारण नाही. आपण या मोहीमेत जे यश मिळवले आहे ते लहान नाही, देशाला तुमचा अभिमान आहे अशी संवेदनाही पंतप्रधानांनी प्रकट केली आहे.
इस्त्रोच्या मिशन ऑपरेशन संकुलात त्यांनी वैज्ञानिकांशी संपर्क साधला त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की वैज्ञानिकांनी जे प्रयत्न केले त्यातून तुम्हाला बरेच काही शिकायला मिळाले आहे. या संपर्क पुन्हा प्रस्थापित झाल्यास पुन्हा आपल्याला तेथून काही संदेश मिळू शकतात असे मला वैज्ञानिकांनी सांगितले आहे. तर आपण तसे घडेल अशी आशा बाळगुयात असेही त्यांनी म्हटले आहे.
आपला भविष्यातील हा प्रवास चालूच राहणार आहे सारा देश तुमच्या बरोबर आहे, तुम्ही देशाला अभिमान वाटावा अशीच कामगीरी केली आहे असेही मोदींनी म्हटले आहे. वैज्ञानिकांमध्ये या अपयशामुळे निराशा आली असली तरी त्यांनी आशा सोडू नये असेही त्यांनी म्हटले आहे. गृहमंत्री अमित शहा यांनीही इस्त्रोच्या वैज्ञानिकांचा देशाला अभिमान असल्याचा संदेश प्रसारीत केला आहे.