आळंदी (वार्ताहर) – शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलांनंतर संस्काराची शिदोरी आणि उज्ज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या शाळेच्या आठवणी आयुष्यात कधीही विसरल्या जात नाहीत हे सत्य आहे. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर विद्यालयातील 1988-89 मध्ये दहावीत असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आणि गुरू जनांचा कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शाळेतील सेवानिवृत्त आणि तत्कालीन शिक्षक, यांना फेटा बांधून औक्षण करत शाल श्रीफळ, स्मृतीचिन्ह, पुष्प गुच्छ देऊन देऊन सन्मान करण्यात आला. मुलींनी पूर्वीचे नाव सासरचे नाव अशी ओळखपरेड झाली. प्रत्येकाने आपली कौटुंबिक पार्श्वभूमी कार्यक्षेत्र सांगितले. शेतीपासून ते वकिल, सीए, पत्रकार, इंजिनिअर, उद्योजक, शिक्षण, प्रशासन, उद्योग, सेवा, कला, संस्कृती, नोकरदार,
विविध आदी क्षेत्रांत आदी क्षेत्रांत आपल्या कामगिरीचा ठसा उमटवलेल्या उच्चपदावर कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थीनी आपले अनुभव कथन केले. अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी बर्याच वर्षांनंतर एकमेकांना भेटले. त्यामुळे उपस्थित शिक्षक विद्यार्थीनी मनोगत व्यक्त करून अनेक जुन्या आठवणींना नव्याने उजाळा दिला. अनेकांना आपले शाळेचे जुने मित्र-मैत्रिणी भेटल्यामुळे चेहर्यावरील आनंद ओसंडून वाहत होता; परत एकदा सुमारे 100 हुन अधिक विद्यार्थी एकत्र आल्याने सर्व माजी विद्यार्थी आठवणीत हरवून गेले होते.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने तत्कालीन शिक्षक प्रमोद मंजुळे, गोविंद यादव, नानासाहेब साठे, हमीद शेख, छाया गायकवाड, दिपक मुंगसे, सरला जोशी, वृषाली पारख उपस्थित होते. आपले मनोगत व्यक्त करताना माजी विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकही भावूक झाल्याचे दिसून आले.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र गिलबिले, पुणे मनपा शिक्षण संचालिका शिल्पकला रंधवे, उद्योजक जनार्दन सोनवणे, संजय कडदेकर, शिवाजी भोसले, कांचन उकीरडे, लीला थोरवे, मनिषा पिंपरकर, सुधीर कुर्हाडे, संतोष ठाकूर तसेच अनेक माजी विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.