आळंदी, (वार्ताहर) – श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात चांदीच्या रथाला जुंपण्यात येणार्या मानाच्या बैलजोडीचा मान यंदा आळंदीतील कुर्हाडे घराण्याला मिळाला आहे. कुर्हाडे घराण्यातील प्रगतशील शेतकरी सहादू बाबूराव कुर्हाडे (वस्ताद) यांना बैलजोडीचा मान देण्यात आला असल्याचे आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी सांगितले.
माऊलींच्या पालखी सोहळ्याला बैलजोडी देण्याचा मान हा आळंदी गावातील कुर्हाडे, घुंडरे, भोसले, वरखडे, वहीले, रानवडे कुटुंबालाच मिळतो. आळंदी सोडून बाहेरील ग्रामस्थांना हा मान आजवर दिला गेलेला नाही. कारण ही प्रथा खूप काळापासून अशी सुरू आहे, असे बैलजोडी समितीचे अध्यक्ष बबनराव कुर्हाडे यांनी सांगितले.
बैलजोडी समितीची बैठक काही दिवसांपूर्वी आळंदीत झाली. त्यावेळी बबनराव कुर्हाडे, नंदकुमार कुर्हाडे, विलास घुंडरे, शिवाजी रानवडे, रामचंद्र भोसले, ज्ञानेश्वर वहीले, रमेश कुर्हाडे यांच्यासह सर्व सदस्यांची हजेरी होती. बैठकीदरम्यान कुर्हाडे कुटुंबातून पाच अर्ज आले होते त्यातून सर्वानुमते बैलजोडी जुंपण्याचा मान सहादू बाबूराव कुर्हाडे (वस्ताद) यांना मिळाला आहे.
यावेळी मंदिरात व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बैलजोडी समितीचे सर्व सदस्य, माजी उपनगराध्यक्ष सागर भोसले, चंद्रकांत कुर्हाडे, सचिन रानवडे, तान्हाजी कुर्हाडे, पांडुरंग वरखडे, योगेश कुर्हाडे, चिंतामणी कुर्हाडे, सिध्देश कुर्हाडे, ज्ञानेश्वर कुर्हाडे, महेश कुर्हाडे, गणेश कुर्हाडे, तसेच आळंदीकर ग्रामस्थ उपस्थित होते.
आयुष्यातील सर्वांत ओठा आनंद सोहळा
सहादू बाबूराव कुर्हाडे अनेक वर्षे पालखी सोहळ्यात बैलजोडीची सेवा करत असून यावेळी स्वतःची बैलजोडी रथाला जुंपण्याची सेवा मिळाली हा आयुष्यातील सर्वांत मोठा आनंद सोहळा आहे असे बैलजोडीचे मानकरी सहादू बाबूराव कुर्हाडे वस्ताद यांनी यावेळी सांगितले. बैलजोडीचा मान मिळाल्याने कुर्हाडे कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.