पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना पुणे शहराच्या वतीने मेळावा तिळगुळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महिलांचे खेळ, उखाणा स्पर्धा, महिलांना गृह उद्योगाच्या व्यवसायाच्या अनेक संधी, महिला सक्षमीकरण अशा विषयांवर अनुभवी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रसंगी ऍड. अर्चना मोरे म्हणाल्या की, महिला सक्षमीकरण म्हणजे महिलांचा वैयक्तिक विकास आणि त्यांना सर्व निर्णय स्वतः घेण्याचे अधिकार देणे. भारतातील बहुतेक निरक्षर लोकसंख्येमध्ये महिलांचा समावेश आहे. महिला सक्षमीकरण म्हणजे स्त्रियांना शिक्षित करणे तसेच त्यांना त्यांच्या देश, समाज आणि कुटुंबाशी संबंधित निर्णय घेण्यास सक्षम बनवणे. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे.
महिलांना घरी व्यवसायाच्या अनेक संधी बाबतचे व्यवसायाभीमुख मार्गदर्शन नेट्सर्फ कंपनीच्या लक्ष्मी पाटील, देशपांडे ताई यांनी केले. उखाणे स्पर्धा, मनसे पक्षाबाबतच्या प्रश्नमंजुषा, पारंपारीक, आधुनिक विचारांचे वाण सर्व महिलांना देण्यात आले. या कार्यक्रमात अनेक महिला सहभागी झाल्या होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन पुणे शहर अध्यक्षा वनिता वागसकर यांनी केले. कर्यक्रमाचे सूत्रसंचालन अपूर्वा सपकाळ यांनी केले.