मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आम्हाला मातोश्रीवर बोलावले, तर नक्की जाऊ, असे विधान शिंदे गटातील आमदार संतोष बांगर यांनी केले आहे.
संतोष बांगर म्हणाले, मातोश्रीवरील आमचे प्रेम अद्यापही कायम आहे. राजकारणात काहीही होऊ शकते. आजही उद्धव ठाकरेंबाबत आम्हाला आदर आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आम्हाला सन्मानपूर्वक मातोश्रीवर बोलवल्यास आम्ही जायला तयार आहोत.
तसेच मातोश्रीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला आणि पुन्हा शिवसेना आणि भाजपाची युती झाल्यास प्रत्येक शिवसैनिकाला त्याचा आनंद होईल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, आम्हाला नोटीसा पाठवल्या आहेत. मात्र चिंता नाही. न्यायालय जो निर्णय देईल, तो आम्हाला मान्य असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.