नवी दिल्ली – शेतकऱ्यांच्या जमिनीचा लिलाव करणाऱ्या भाजपच्या पोस्टरवरून (advertisement of bjp) जैसलमेरमध्ये वाद वाढला आहे. पोस्टरमधील फोटोवर आक्षेप घेणारे शेतकरी मधुराम यांनी रामदेवरा पोलिस ठाण्यात भाजपविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे. (Defamation case filed against BJP)
शेतकरी मधुराम म्हणतात की, भाजपने त्यांच्या परवानगीशिवाय त्यांचा फोटो पोस्टरमध्ये वापरला आहे. त्यांच्या एकाही जमिनीचा लिलाव झालेला नाही आणि माझ्यावर कोणतेही कर्ज नाही, असे मधुराम (Farmer Mathuram) यांनी स्पष्ट केले.
राज्यभर निवडणुकीच्या संदर्भात भाजपकडून ‘नही सहेगा राजस्थान…’ (nahi sahega rajasthan) अभियान सुरू करण्यात आले आहे. यावेळी भाजपने शेतकऱ्यांशी (jaiselmer farmer) संबंधित पोस्टर जारी केले. ज्यावर शेतकरी मधुरामचा फोटो छापला आहे. कसलीही माहिती न घेता भाजप शेतकऱ्यांची बदनामी करत असल्याचे मधुरामचे म्हणणे आहे. माझ्या जमिनीचा ना लिलाव झाला ना माझ्यावर काही कर्ज आहे. भाजप स्वत:च्या फायद्यासाठी त्यांच्या फोटोचा चुकीचा वापर करत आहे. या संतापामुळे शेतकरी मधुराम यांनी रामदेवरा पोलीस ठाण्यात भाजपविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे.
भाजपच्या (bjp) या पोस्टरवर कर्जवसुलीसाठी 19 हजार शेतकऱ्यांच्या जमिनीचा लिलाव झाल्याचे लिहिले आहे. भाजपच्या या खोटेपणामुळे माझी प्रतिष्ठा दुखावली गेली आहे. माझ्याकडे 200 गुंठे जमीन आहे. जैसलमेर भाजप जिल्हाध्यक्ष, भाजप ब्लॉक अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकरी मधुराम यांनी केली आहे. रामदेवरा पोलिसांनी सांगितले की, तक्रारीवर कारवाई करून कलम 500 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.