अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा ना. तनपुरेंमुळे मार्ग मोकळा
राहुरी – राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी ग्रामपंचायत अंतर्गत वाघाचा आखाडा स्वतंत्र ग्रामपंचायत असावी, अशी तेथील नागरीकांची अनेक वर्षापासून मागणी होती. या मागणीस्तव शासनाने दि. 28 फेब्रुवारी रोजी अधिकृत राजपत्र प्रकाशित करुन वाघाचा आखाडा स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन झाल्याचे घोषीत केले. वाघाचा आखाडा नागरिकांचे अनेक वर्षाचे स्पप्न पूर्ण झाले.
वाघाचा आखाडा येथील नागरीकांनी राजपत्र प्रकाशित होताच फटाके वाजवून आपला आनंद व्यक्त केला व संपूर्ण गावात या ऐतिहासिक कामगिरीबद्दल वाघाचा आखाडा व परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. वाघाचा आखाडा हे गाव तांदुळवाडी ग्रामपंचायतीचा प्रभाग होता. तांदुळवाडी ते वाघाचा आखाडा या दोन गावातील अंतर जास्त असल्यामुळे वाघाचा आखाडा गावात विकास कामे करण्यात अडचणी येत असत. वाघाचा आखाडा या गावास स्वतंत्र ग्रामपंचायत असावी, अशी तेथील नागरिकांची अनेक वर्षापासूनची मागणी होती. तत्कालीन आमदार प्रसाद तनपुरे यांनी 2002 साली स्वतंत्र गावाचा प्रस्ताव शासन दरबारी सादर केला होता. काही तांत्रिक अडचणींमुळे या प्रस्तावास शासनाने कोणताही निर्णय न घेतल्यामुळे प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित होता.
ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी गावास स्वतंत्र महसुली दर्जा असावा यासाठी ना.जयंत पाटील व ना.प्राजक्त तनपुरे यांच्या प्रयत्नातुन व ग्रा.पं. सदस्य आदिनाथ तनपुरे व सहकारी शरद धसाळ व रेखाताई कटारे यांच्या पाठपुराव्याने फेब्रुवारी 2018 साली स्वतंत्र महसुली दर्जा प्राप्त करुन दिला होता. स्वतंत्र महसुल गावास स्वतंत्र ग्रामपंचायत असावी, अशी तेथील नागरीकांची मागणी असल्याने एप्रिल 2018 साली पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषदेस प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या प्रस्तावास मागील सरकारच्या काळात अनेक त्रुटी काढण्यात आल्या.
या त्रुटी ग्रा.पं. सदस्य आदिनाथ तनपुरे व सहकारी यांनी वेळोवळी पूर्ण केल्या होत्या. ना. प्राजक्त तनपुरे यांच्या प्रयत्नाने ग्रा.पं. सदस्य आदिनाथ तनपुरे, शरद धसाळ व रेखाताई कटारे यांनी पुन्हा पाठपुरावा चालु केला. तब्बल 1 महिनाभर ग्रामपंचायत सदस्य मुंबईत मुक्कामी राहुन पाठपुरावा केला. अखेर 28 फेब्रुवारी रोजी शासनाने अधिकृत राजपत्र प्रदर्शित करुन वाघाचा आखाडा स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन झाल्याची घोषणा केली.
याकामी तांदुळवाडी सरपंच अनिता निकम, उपसरपंच बाळासाहेब कांबळे, इंद्रभान पेरणे, सूर्यभान म्हसे, स्वाती धसाळ आदींसह अशोक सप्रे, विलास धसाळ, अशोक तनपुरे, सुभाष वाघ, सुधाकर कटारे, किशोर दोड, सुनिल सप्रे, उत्तम वाघ, गणेश वाघ, संतोष सप्रे, गोविंद वाघ, पप्पु वरखडे, बबन आघाव, महेश तनपुरे, राजु सप्रे, देवराम माळी, शरद तनपुरे, रविंद्र तनपुरे यांच्यासह ग्रामस्थांनी प्रयत्न केले. वाघाचा आखाडा स्वतंत्र ग्रामपंचायत करणे कामी ना. तनपुरे यांचा सिंहाचा वाटा असल्याने ग्रा.पं. सदस्य आदिनाथ तनपुरे शरद धसाळ व रेखाताई कटारे व ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला. तसेच या कार्यास मा. सुहास आघाव व राजेंद्र पाटील यांचे सहकार्य लाभल्याने ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.
तांदुळवाडीचा प्रभाग असलेल्या वाघाचा गाव ग्रामपंचायतीपासून 3 कि.मी दूर असल्याने नागरीकांचे प्रश्न सोडविण्याकामी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. परंतु पहिल्यांदाच आमदार होऊन राज्यात राज्यमंत्री म्हणून संधी मिळालेले ना.तनपुरे यांच्या प्रयत्नामुळे अनेक वर्षापासून स्वतंत्र ग्रामपंचायतचे स्वप्न पूर्ण झाले..
आदिनाथ तनपुरे, ग्रा.पं. सदस्य तांदुळवाडी