वाघळवाडी – करोनामुळे सगळ्याच क्षेत्रांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. लॉकडाऊनमध्ये अनेक उद्योग उद्ध्वस्त झाले असून त्याचा सर्वाधिक फटका शेतीशी निगडित कुक्कुटपालन, शेळी व प्रामुख्याने दूध व्यवसायावर झाला आहे. बारामती तालुक्यातील खासगी तसेच सहकारी दूध संस्थांमधील दूध पुढे जात नसल्याने दूध विक्री थेट 40 ते 35 टक्क्यांवर आली असल्याने शेतकऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचे संकट अधिक तीव्र झाले आहेत.
लॉकडाऊन असल्याने दुधापासून बनविण्यात येणाऱ्या पदर्थांना काही दिवसांपूर्वीच परवानी जरी मिळली असली तरी भीतीने नागरिक ती खरेदी करीत नाही, तर ही परवानगी मिळण्या आगोदर केवळ दूधच विकेले जात असल्याने बारामती तालुक्यात लाखो रुपायांचे दूध वाया गेले असून, मागणी नसल्याने भावही घसरल्याने दूध उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असून गायी-म्हशींना
खाद्य कसे घालावे या विंवचनेने त्याला ग्रासले आहे.
अवकाळीमुळ पीक हतातून गेली आहेत तर दुधाच्या किंमती खाली आल्यामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसमोर रोजीरोटीचे संकट आले आहे.त्यातच भर म्हणून की काय उन्हाळ्यामुळे हिरवा चारा उपलब्ध होत नसल्याने पशुखाद्य असलेल्या पेंढीच्या दरामध्ये वाढ झालेली असून तो खर्च करायचा कसा असा प्रश्न दूध उत्पादकांसमोर निर्माण झाला आहे.
हंगाम हातातून गेला
फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी दुधाच्या मागणीमध्ये वाढ होत असते. उन्हाची तीव्रता वाढते तसतसे बाजारपेठांमध्ये दुधाच्या उपपदार्थांना ताक, लसी, दही, श्रीखंड, कुल्फी, आइस्क्रीमची मागणी वाढत असते. त्यामुळे परिणामी दुधाची मागणी वाढते त्यामुळे दुध दर ही वाढतात .पण या वर्षी करोनाच्या संकटामुळे सर्वत्र मागणी मंदावली आहे परिणामी दूध दर घसरले आहेत.