वाल्हे: पुरंदर तालुक्यातील वाल्हे व परिसरामधील शेतकरी गेली अनेक वर्षे दुष्काळी होता. मागील वर्षी पाऊस चांगला झाला. व नंतर अवकाळी पाऊस आणि आता अवकाळी पावसामधून बचावलेल्या पिकांना होत असलेले विविध रोगांमुळे येथील शेतकरी मेटाकुटीस आला आहे.
वातावरणातील बदलाचा विपरीत परिणाम शेतीवर आणि पर्यायाने पिकांवर होत आहे. अवकाळी पाऊसानंतर आता ढगाळ हवामान झाल्याने फळबागांसह, पिकांवर करपा व तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव निर्माण झाल्याने उत्पादन व उत्पन्न घटल्याने शेतकरीवर्ग धास्तावला आहे.
वाल्हे येथील शेतकरी शेतीसह दुध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करतात. जनावरांना ओला चारा म्हणून, मका, कडवळ आदी चारा करतात. मागील काही दिवसापासून मका पिकांवर लष्करी आळीचा प्रादुर्भाव झाल्याने मका पिक वाचवण्यासाठी अनेक शेतकरी वर्ग त्यासाठी औषध फवारणी करताना दिसत आहेत.
लष्करी अळी मका पिकांला झाल्यावर मकेची पाणे आळी खाऊन, मका पिकांच्या कोब्यामध्ये अळी राहिल्याने, व ती मका चा-यामधून जनावरांच्या पोटामधे गेल्यावर, जनावरांचे पोट फुगून जनावरे दगवण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे येथील शेतकरी मका पिकांवर लष्करी अळीचा नाश करण्यासाठी औषध फवारणी करतानादिसत आहेत.
मात्र, कोरोनाच्या संकटामध्ये शेतकरी वर्गाच्या कोणत्याही शेतमालासह बाजारभाव मिळत नसल्याने, तसेच दुधाचे बाजार भाव मिनरल वॉटर पेक्षा कमी झाल्याने, आगोदरच आर्थिक संकटात असलेल्या शेतक-याला मका पिक वाचवण्यासाठी ,औषध फवारणीसाठी अधिक आर्थिक संकटाच्या खोलामध्ये गेल्याने शेतकरी मोठ्या संकटामध्ये सापडला आहे.