मुंबई – ज्या गड-किल्ल्यांवर शत्रूच्या रक्ताचे पाट वाहिले त्या किल्ल्यांवर जाऊन दारू आणि सिगारेट ओढण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहे. दरम्यान, अश्या प्रकारचे गैरवर्तवणूक करणाऱ्या तळीरामांना आता 6 महिन्यांचा सश्रम कारावास आणि 10 हजार रुपयांचा दंड होणार आहे. तसेच संबंधित व्यक्ती कडून जर असं गैरकृत्य पुन्हा एकदा झालं तर त्याच्या शिक्षेचा कालावधी 1 वर्षाचा असणारा आहे.
दरम्यान, राज्य सरकारने घेतलेल्या या महत्वपूर्ण निर्णयाचं शिवप्रेमींनी आणि गडप्रेमींनी स्वागत केलं आहे. शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्याचे पावित्र्य कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.