पुणे-मराठा आरक्षणाला विरोध नाही, मात्र त्यासाठी परीक्षा पुढे ढकलण्याची गरज नाही, असे मत एमपीएससी (MPSC )देणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे. राजकीय पक्ष, विविध संघटना तसेच सरकारने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नये, त्यातून विद्यार्थ्यांच मोठे नुकसान होईल, अशी प्रतिक्रिया खासदार छत्रपती संभाजी राजे व्यक्त केली. ते पुण्यात बोलत होते.
एमपीएससीच्या परीक्षा झाल्या तर राज्य सरकारला वाईट परिणाम भोगावे लागतील, असा गंभीर इशारा त्यांनी दिला आहे. एमपीएससीची सर्व परीक्षा केंद्र ११ ऑक्टोबरला बंद करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, त्यांच्या या इशाऱ्यामुळे आता एमपीएससीच्या परीक्षांबाबत पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. परीक्षा पुढे ढकलण्याची गरज नाही, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.